
शिवसेनेची आदर्शवत संघटना रत्नागिरीत:- ना.उदय सामंत
रत्नागिरी : आज राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमदार रवींद्र फाटक,माजी आमदार सदानंद चव्हाण,जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी, महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी, उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये,उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू, उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार, चिपळूण तालुकाप्रमुख बापू आयरे,राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले, लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, रत्नागिरी तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, युवा सेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, जिल्हा प्रमुख युवा सेना मन्ना देसाई, केतन शेट्टी शहरप्रमुख महिला आघाडी स्मितल पावसकर, सनी प्रसादे,यांच्या सहित अनेक पदाधिकारी उपस्थिती होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकारी यांचे कौतूक करत शिवसेनेची आदर्शवत संघटना रत्नागिरीत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी उदय सामंत म्हणाले लोकसभेचे ४८ उमेदवार निवडून देऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न आहे ते स्वप्न आपण सगळ्यानी साकार करु या असे आहावन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी निवडणूकीच्या तिकिटासाठी काम न करता पक्षाच्या संघटन बांधणीसाठी काम करण्याचे आदेश यावेळी उदय सामंत यांनी दिले.पक्षाचे गटप्रमुख, शिवदूत, शाखाप्रमुख यांनी पक्षाच्या संघटना बांधणीसाठी काम करण्याची गरज आहे.शिवसेना,भाजपा, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जे उमेदवार ठरवतील तोच उमेदवार राहणार असून तो सर्वाना स्वीकारावा लागेल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी शिवदूत, शाखा प्रमुख यांची जोरदार बांधणी करा.या पक्ष मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती.

