
भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी अस्लम बक्षी
रत्नागिरी: तालुक्यातील जयगड येथील सामाजिक कार्यकर्ते अस्लम बक्षी यांची भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यापूवी ल्यानी भाजपा अल्पसंख्यांक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली होती. तसेच ते भाजपा- शिवसेना युतीच्या शासन कालावधीत ते विशेष कार्यकारी अधिकारीही होते. तसेच त्यांनी शिवसेनेच्या जयगड विभाग
कार्यालयप्रमुख पदीही काम केले होते. त्यांनी सन २००६ मध्ये शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी असताना दिवाळी मिलन हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला होता. मुस्लिम समाजामध्ये भाजपाचे घर-घर चलो अभियान आणि शतः प्रतिशत भाजपा अभियान हे जोरदारपणे राबविले होते. बक्षी • यानी सामाजिक कार्यात भरीव कामगिरी करताना जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळावर १५ वर्ष सहसचिव पदाची धुरा लाभाळली होती. सन २००५ ते २००७ या कालावधीत ते रत्नागिरी तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्षही होते. त्यांनी विविध पदावर यशस्वीपणे बजावलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपा तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.