
संपर्क युनिक फाउंडेशन व आश्रय संस्थेच्या वतीने सद भावना दिवस साजरा
रत्नागिर : रत्नागिरी शहरातील संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे संस्थापक तसेच आश्रय संघटनेचे सल्लागार मरहुम दिलावर कोंडकरी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त व आश्रय संस्थेच्या तृतीय वर्धापनदिन निमित्ताने २१ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मरहुम दिलावर कोंडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सद्भावना पुरस्कार प्रदान करण्यात आले.यामध्ये जलतरण स्पर्धेत निधी शरद भिडे वय वर्षे ११ हिने तब्बल ५५ पदके पटकावली, रत्नागिरी शहरातील धनज्योती प्रभाग संघ या संस्थेने१९० बचत गटा़चा समूहाचा संघ स्थापन करुन महिलांना स्वावलंबी बनविले, दैनिक सकाळ व दैनिक लोकमत रत्नागिरी आवृत्ती यांनी ज्येष्ठ नागरिक यांचे साठी उपयुक्त असे लिखाण प्रसिद्ध केले,कोरोना काळात रिक्षा व्यावसायिकांनी, रुग्णवाहिकांनी तसेच पोलिस मित्रांनी सहकार्य केले, आयुष्यमान भारत कार्ड, आरोग्य तपासणी पथक या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच वय वर्षे ८० च्या पुढे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.सुहेल मुकादम या़च्या कार्याबाबत आश्रय संघटनेचे पदाधिकारी यांनी त्यांचा सन्मान केला.
प्रारंभी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी प्रास्ताविक करून मरहुम दिलावर कोंडकरी यांच्या कार्याची आठवण करून दिली व दरवर्षी २१ डिसेंबर हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले.आश्रय संघटनेचे सचिव अहमद मालवणकर, संस्थापक सुहेल मुकादम, सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज,सचिन शिंदे, धनज्योती प्रभाग च्या नेहा केळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून दोन्ही संस्थांच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमासाठी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, सभासद, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

