
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात प्रवाश्यांच्या सोयीसाठी शेअर रिक्षा थांबा व्हावा, मनसेची मागणी
कोकण रेल्वे विभागीय व्यवस्थापकांसोबतच्या भेटीत मनसे पदाधिकाऱ्यांकडून मागणी
रत्नागिरी :रेल्वे स्थानक परिसरात अनेकदा मीटर प्रमाणे भाडे न आकारता अवास्तव रिक्षा भाडे आकारून रेल्वे प्रवाश्यांची पिळवणूक केली जाते याला शेअर रिक्षा हा सोयीस्कर व परवडणारा पर्याय प्रवाश्यांकडून अवलंबला जातो, मात्र शेअर रिक्षा चालकांच्या बाबतीत सतत दादागिरी व वादविवाद यांसारखे प्रकार घडतात या सर्व गोष्टींना कायमचा चाप बसावा व रेल्वे प्रवाश्यांना सोयीस्कर रिक्षा प्रवास सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आज मनसे पदाधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे विभागीय व्यवस्थापकांची भेट घेत रेल्वे स्थानक परिसरात कायमस्वरूपी शेअर रिक्षा थांबा उभारण्यास परवानगी देऊन समस्त प्रवासीवर्ग व शेअर रिक्षा चालक बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, उपविभागअध्यक्ष ऋषिकेश रसाळ, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतिश खामकर ,मनविसे शहरअध्यक्ष तेजस साळवी, अनंत शिंदे, भाई साळवी, धनंजय पाटील, रिक्षाचालक इम्रान नेवरेकर, अमोल शिंदे, महेंद्र शिंदे, प्रदीप साळुंके, तौफिक पावसकर,दिनेश भागवत, रिजवान नेवरेकर, प्रशांत बेहरे, संजय वाडकर,आदी उपस्थित होते.
