
जिल्हयात ‘सांबर’ प्रजातिच्या संख्येत लक्षणीय वाढ
खेड :सांबर हरीण भारतात आढळणारी हरीणाची मुख्य जात असून सद्या या प्रजाती चे अस्तित्व कोकणातील खेड तालुक्यसह रत्नागिरी जिल्ह्यातील घनदाट जंगलात लक्षणीय वाढ झाली असल्याची दिलासादायक माहिती उपलब्ध झाली असून खेड मधील आवाशी नजीक वाहनाच्या धडकेत मृत्यू मुखी पडलेल्या सांबर या प्रजाती चे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याची बाब प्राणी मित्रांनी हेरली आहे
सह्याद्रीच्या पर्वत रांगा मधील घनदाट जंगल हे अनेक प्राण्याचे आश्रय स्थान आहे या जंगला मध्ये हिंस्त्र प्राण्या सह उपद्रव न देणारी प्राणी देखील आहेत मात्र यातील हरीण या प्रकारातील सांबर ही जात सह्याद्रीच्या जंगलात आढळून आल्याने प्राणी मित्रांना देखील आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे
सह्याद्रीच्या कोयना अभयारण्य मध्ये सांबर प्रजाती असल्याची माहिती पुढे आली असून पट्टेरी वाघाचे मुख्य खाद्य असलेले सांबर आहे मात्र वाघाचे अस्तित्व नसल्याने ही प्रजात वेगाने वाढत आहे मुबलक पाणी,गवत , चारा मिळत असल्याने त्याच बरोबर शिकारी वर काही अंशी निरबंध आल्याने या प्रजातीने सद्या मानवी वस्ती जवळ असलेल्या ठिकाणी आपले बस्तान बसवले आहे त्या मूळे च ही प्रजात सध्या दृष्टी पथात येत आहे कोकणात या प्रजाती चा टक्का हळूहळू वाढू लागल्याने ही बाब तितकीच दिलासा देणारी ठरली आहे
भारतात आढळणाऱ्या हरीणांमध्ये आकाराने सर्वात मोठे हे हरीण आहे. खांद्या पर्यंत याची उंची साधारणपणे १ ते दीड मीटर पर्यंत भरते तर पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सहजपणे ४०० ते ५०० किलो पर्यंत भरू शकते
याची वर्गवारी हरीणांच्या सारंग कुळात होते या कुळातील हरीणांच्या मादींना शिंगे नसतात. नरांची शिंगे भरीव असून दरवर्षी उगवतात व गळतात. शिंगाना अनेक टोके असतात. सांबरांच्या एका शिंगाला पुढे १ व मागे दोन अशी एकूण तीन टोके असतात. माद्या नेहेमी कळप करून रहातात त्यांचा कळप ८ ते १० जणांचा असतो. नर शक्यतो एकटेच असतात.सांबरांचे मुख्य खाद्य शाकाहारी असल्याने गवत, पाने, फळे इत्यादी आहे.
सांबराचे मुख्य शत्रु वाघ , बिबट्या, तळ्यांमधील मगरी व रानकुत्री आहेत. आकार मोठा असल्याने वाघांचे सर्वात आवडते खाद्य आहे.
सांबर हे मुख्यत्वे भारतात किंवा भारतीय उपखंडात आढळते. विविध भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्या शरीरात बदल घडले आहेत. त्यांचे नैसर्गिक वसतीस्थान हे दाट ते घनदाट जंगले आहे. त्यांची नोंद विषववृतीय अती घनदाट जंगलांपासून ते शुष्क पानगळीच्या जंगलात तसेच उत्तरेत सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलात पण झाली आहे. भारतातील शुष्क काटेरी व वाळवंटी प्रदेश सोडून ते सर्व प्रकारच्या जंगलात आढळतात. परंतु दाट ते घनदाट जंगले ते जास्त पसंत करतात. तसेच पाण्याच्या जवळ राहणे ते पसंत करतात. म्हणूनच मुख्य राष्ट्रीय उद्यानात हे तेथील तलावांपाशी हमखास आढळून येतात
सांबरांचा विणीचा हंगाम सप्टेंबर ते डिसेंबर असतो. या काळात नरांच्या शिंगाची वाढ पूर्ण झालेली असते. अनेक नर मादीच्या कळपावर हक्क प्रस्थापीत करण्यासाठी शिंगांनी चढाओढ करतात. यात सर्वात शक्तिशाली नर मादींच्या कळपाचा म्होरक्या होतो. माद्या साधरपणे मे ते जुनच्या दरम्यान प्रसावतात