
रत्नागिरीतून सोलापूर, पुणे, कोल्हापूर, अक्कलकोट मार्गांवरील एसटी वाहतूक पूर्ववत
रत्नागिरी :मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेसची तोडफोड करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरीतून सोलापूर, पुणे, कोल्हापूर, अक्कलकोट मार्गांवरील 48 फेर्या बंद ठेवण्यात आल्या होत्य. मात्र , हे आंदोलन मागे घेण्यात आल्याने दोन दिवसापासून पुन्हा या सर्व फेर्या सुरळीत सुरु करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाने दिली.
48 फेर्या दोन तीन दिवस बंद ठेवल्याने एसटीच्या रत्नाागिरी विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बर्याच एस.टी. गाड्यांची मोडतोड झाल्याने रत्नागिरी विभागाने काही जिल्हा मार्गावरच्या फेर्या पूर्णपणे बंद ठेवल्या होत्या. आता या सर्व फेर्या पुन्हा सुरु करण्यात आले आहे.