
काजळी नदी संवर्धन अमृतवाहिनी, ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण
रत्नागिरी : ” चला जाणूया नदीला ” अभियान काजळी नदी संवर्धन अमृतवाहिनी, ग्रुप ग्रामपंचायत आंजणारी, शिरंबवली, नांदिवली, व जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी समारोपीय वर्षानिमित्त ‘मेरी मिट्टी, मेरा देश अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम 2023., माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता मोहीम अंतर्गत वृक्षदिंडी, वृक्षरोपण मोहीम राबवण्यात आली. तसेच स्वच्छतेची शपथ व प्रभात फेरी, स्वच्छता श्रमदान, “मेरी मिट्टी मेरा देश अमृत कलशामध्ये माती गोळा करणे असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीकोनातून जैवविधता उद्यान साठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने निर्मिती आणि मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण होईल असे संकल्प चला जनुया नदीला अभियानातून पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे .चला जानुया नदीला अभियान काजळी नदी काठावरील महसूल गावांनी मातीचे क्षरण थांबविणे, नदीचा तट , पूर परिस्थिती, ओला व सुका दुष्काळ नियोजनसाठी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत बहावा, हरडा, हेला, आवळा, जांभूळ, आपटा, मोहगणी, बेल, लिंबू, शमी, काजू, रिंगी आदी रोपे लावण्यात आली.

यावेळी अनिल कांबळे, रोहन रमेश इंगळे, अशासकिय जिल्हा समिती सदस्य प्रविण प्रभाकर शिखरे, सरपंच आंजणारी, सुधिर परशुराम रसाळ, मुख्याध्यापक जि.प. शाळा आंजणारी महेंद्र शिंदे, बाबा माने , संदिप रसाळ , शिक्षक वर्ग , समिर गमरे, ग्रामसेवक अंजली चव्हाण. अंगणवाडी सेविका , तसेच आंजणारी गातातील प्रकाश नरीम, सखाराम पेंढारी, दिपक पाष्टे, रविंद्र गावडे, संतोष गुरव आणि जि.प शाळा आंजणारीचे विद्यार्थी उपस्थित होते