
काजिर्डा घाटरस्त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात
राजापूर:राज्य सरकारच्या यावर्षी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राजापूर व कोल्हापूर यान्ना जोडणाऱ्या काजिर्डा घाटरस्त्याच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार त्याचा आराखडा तयार करण्यात आला असुन निविदा प्रक्रीया सुरु असल्याचे वृत्त आहे ..या घाटाच्या खोदकामानंतर कोकणातुन कोल्हापूरला जोडणारा आणखी एक घाटमार्ग भविष्यात उपलब्द होणार आहे. दोन वर्षांपुर्वी (जुलै २०२१)मध्ये कोकणात झालेल्या अतीवृष्टीत काही घाटांत दरडी कोसळुन कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्राशी दळणवळणाचा संपर्क काही काळ बंद पडला होता. त्या पार्श्वभूमीवर कोकण - कोल्हापूरसाठी एखादा भक्कम आणि तेवढाच महत्वपूर्ण घाट असणे किती गरजेचे आहे ते अधोरेखित ठरले होते .आणि त्या दृष्टीने काजिर्डा घाट रस्त्याचा मुद्दा जोरकसपणे पुढे आला. यापुर्वी सत्तरीच्या दशकात (१९७४/७८) रोजगार हमी योजनेतुन काजिर्डा कोल्हापूर जोडणाऱ्या घाटाच्या खोदकामाचे काम हाती घेण्यात आले होते.मात्र त्याच दरम्यान अणुस्कुरा घाटाच्या खोदकामाला आरंभ झाला आणि काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचे काम मागे पडले ते कायमचेच. नंतर अणुस्कुरा सह गगनबावडा घाटान्ना महत्व प्राप्त झाल्याने काजिर्डा घाट मार्ग विजनवासात गेला नंतरच्या कालखंडात काजिर्डा गावात मोठा लपा प्रकल्प मंजुर झाला आणि त्याचे काम देखील सुरु झाले होते तथापी अनेक मुद्द्यांवरुन स्थानिक जनतेतुन संघर्षाची भुमिका राहिल्याने तो प्रकल्प देखील रखडला शिवाय अन्य काही कारणे देखील त्यामागे होती तरीही अधुन मधुन काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचा मुद्दा चर्चेत असायचाच .मध्यंतरीच्या काळात मनसेच्या वतीने या घाटातील साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते त्यानुसार लोकवर्गणीतुन घाटातील पायवाट साफ करण्यात आली होती .
दोन वर्षापुर्वी कोकणात झालेल्या अतीवृष्टीत कोकण कोल्हापूर जोडणाऱ्या अनेक घाटात मोठ्याप्रमाणावर पडझड झाली होती आंबा घाट देखील त्यातुन सुटला नव्हता त्यावेळी केवळ अणुस्कुरा घाट मार्ग द्वारे कोल्हापूर आणि प महाराष्ट्रकडे जाणारी वाहतुक सुरु होती ..सर्व प्रकारची वाहतुक अणुस्कुरा मार्गे रात्रंदिवस सुरु राहिल्याने त्या घाटात देखील खड्डे पडले होते त्यामुळे अणुस्कुरा घाट सुध्दा असुरक्षीत होतो की काय अशी चिन्हे दिसत होती . अशावेळी कोकण कोल्हापूरला जोडणाऱ्या आणखी एका सुरक्षीत व तेवढाच भक्कम घाटरस्त्याची गरज जाणवू लागली आणि अडगळीत जावुन पडलेल्या काजिर्डा घाटमार्ग एकदम उजेडात आला. कोल्हापूर कोकणला जोडणारा भक्कम व सुरक्षीत म्हणुन काजिर्डा घाटाकडे पाहिले गेले आणि काजिर्डाची दुसरी इनिंग सुरु झाली .
काजिर्डा घाट खोदकाम प्रकरणी राजापूरचे आमदार राजन साळवी यान्नी लक्ष घातले आणि तो प्रश्न शासन दरबारी लावुन धरला होता त्या मुद्द्यावरुन सातत्याने पाठपुरावा केला . काजिर्डा घाटमार्ग कसा उपयुक्त आहे ते पटवुन दिले अखेर त्या प्रश्नी शासनाने सकारात्मकता दर्शविली आणि या पुर्वी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात काजिर्डा घाटाच्या सर्व्हेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती .त्याचे तालुक्यातुन जोरदार स्वागत झाले होते .
काजिर्डा घाट रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात एक कोटीची तरतुद झाल्यानंतर संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन त्याचा आराखडा तयार झाला असुन त्याची निविदा प्रक्रीया सुरु असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे .भविष्यात काजिर्डा कोल्हापूर जोडणाऱ्या घाटरस्त्याचे सर्वेक्षण होवुन त्यानंतर पुढील काम सुरु होईल व कालांतराने कोल्हापूरला जोडणारा एक चांगला घाट रस्ता उपलब्ध होणार आहे.