
पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाचा आढावा
अडचणीत असलेल्या शेतकऱ्याना वेठीस धरल्यास गाठ माझ्याशी:- पालकमंत्री ना.उदयजी सामंत
रत्नागिरी :आज रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी पशुसंवर्धन विभागाच्या बाबतीत आढावा घेतला यावेळेस आलेल्या लंम्पि रोगामुळे जिल्ह्यातील २८ जनावरे मृत्यू मुखी पडले असुन त्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले आहे.अडचणीत असलेल्या शेतकऱ्याना वेठीस धरल्यास गाठ माझ्याशी असल्याचे सांगितले.यावेळी शहर आणि ग्रामीण भागतील भटकी कुत्रे आणि गाई गुरांमुळे जनतेला होणाऱ्या त्रासा बाबत माहिती घेतली.यावेळी जनतेला होणारा त्रास लक्षात घेता मोकाट गुरांचा बंदोबस्त करायचे आदेश पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिले आहे.यावेळी जिल्हाधिकारी देवेदर सिंह,अप्पर जिल्हाधिकारी सूर्यवंशी,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,उपमुख्यकार्यकारी अधिकारी देसाई,तहसीलदार राजाराम म्हात्रे,गटविकास अधिकारी जे.पी जाधव पशुसंवर्धनचे अधिकारी उपस्थित होते.
