
माडबन ग्रामपंचायत इमारतीला अवघ्या तीन वर्षातच तडे
राजापुर:- शासनाच्या जनसुविधा योजनेतून आरसीसी प्रकारात बांधलेल्या दुमजली माड़बन (ता राजापुर) ग्रामपंचायत इमारतीला अवघ्या तीन वर्षातच भले मोठे तड़े गेल्याने खळबळ उडाली असून तिन वर्षातच ही इमारत खाली करण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली असून माड़बन वासियांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून याची सखोल चौकशी होऊन संबधितांवर कठोर करवाई करावी अशी मागणी माड़बन सरपंच बाळू साखरकर यांनी केली आहे.
राज्य शासनाच्या सन 2017/18 जिल्हा वार्षिक योजना म्हणजेच जनसुविधा योजने मधून तब्बल 24.95लाख निधि खर्च करुण माड़बण गावी ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली. या इमारतिचे संपूर्ण काम आरसीसी प्रकारात 1 मार्च 2019ला सुरु करुण 31डीसेम्बर 2020 साली पूर्ण करण्यात आले. राजापुर चे आमदार राजन साळवी यांचे हस्ते या इमारतीचा शुभारंभ करण्यात आला, आणि अवघ्या तिन वर्ष 5 महिन्यात या आरसीसी बांधकामाला ठीकठिकाणी तड़े गेले आहेत. बाजूला अंगणवाड़ी असून या इमारतीमध्ये छोटी छोटी मुले शिकत आहेत. ही इमारत धोकादायक झाली असून अवघ्या तिन वर्ष 5 महिन्यात ही इमारत खाली करण्याची नामुश्की माड़बन वासियानवर आली आहे. बांधकाम खात्याला ग्रामपंचायती कडून पत्रव्यवहार करण्यात आला असून एका अधिकाऱ्याने काही महिन्यापूर्वी येऊन पाहणी केली होती मात्र त्यानंतर या इमारतीची पुनर्बांधणी कोण करणार, इमारतीचे काय करावे याबाबत बांधकाम खात्याकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
त्यामुळे बांधकाम खात्या सहित सबंधित ठेकेदार राजन मोतीराम राठोड याला दुसऱ्यावेळी ग्रामपंचायती कडून पत्र व्यवहार करण्यात आला असून ठेकेदार राजन राठोड यांनी पत्र न स्वीकारल्याने पत्र ग्रामपंचायती कड़े परत आले आले. त्यामुळे संतप्त झालेल्या माड़बन सरपंच बाळू साखरकर, उपसरपंच चंद्रकांत शिरवड़कर, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या ग्रामस्थानी जिल्हा परिषद रत्नागिरी समोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.