
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मुळे मिळाला सर्वसामान्य जनतेला दिलासा
सेतू मध्ये अपूर्ण अर्ज स्वीकारणार…
रत्नागिरी :सेतू कार्यालय रत्नागिरी मधून वेगवेगळ्या दाखल्याचे अर्ज स्वीकारले जातात मात्र त्या दाखल्याच्या अर्जाला एखादे कागदपत्र कमी असेल तर तो अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सेतूतील कर्मचारी स्वीकारात न्हवते. या शासकीय कार्यालयातील आदेशामुळे सेतू कर्मचारी आणि अर्जदारमध्ये वाद निर्माण होत होते. ही बाब मजगांव सरपंच, शिवसेना विभाग संघटक फैयाज मुकादम यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत आणि सिंधुरत्न समिती चे सदस्य किरण सामंत यांच्या निदर्शनात आणून दिली. राज्याचे अधिवेशनात व्यस्त असलेले ना. उदय सामंत यांनी या बाबीची तात्काळ दखल घेत संबंधीत अधिकाऱ्यांना सेतू मध्ये एखादा पुरावा कमी असेल तर अर्ज स्वीकारा आणि त्याच वेळी त्या पुरावयाची पूर्तता करण्यासाठी संबंधीत अर्जदाराला सूचना कराव्यात असे आदेश दिलेत. या आदेशा मुळे आता अपूर्ण अर्ज स्वीकारल्यामुळे अर्जाच्या पावती मुळे शासकीय शिक्षण प्रवेश घेणे सुलभ होणार आहे. विषय जरी छोटा असला तरी तो महत्वाचा होता. ना. उदय सामंत जरी विधानसभेत किती ही व्यस्त असले तरी त्यांचा बारीक लक्ष आपल्या मतदार संघात असतो हे या वरून पुन्हा एकदा दिसून आले. सर्वसामान्य जनतेचं हा विषय मार्गी लावण्यासाठी सिंधुरत्न समिती सदस्य, तथा महाराष्ट्र किर्केट असोसिएशन चे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी मोलाचे सहकार्य केल्याची माहिती मजगांव सरपंच फैयाज मुकादम यांनी दिली.