
६२ कातळशिल्प वगळून बारसू रिफायनरी: मुनगंटीवार
राजापूर:- राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील रिफायनरी प्रकल्प पुरतान ६२ कातळशिल्पे वगळून केली जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली.
या रिफायनरीला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बारसू रिफायनरीला विरोध होत असताना विधानसभेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मोठी घोषणा केली आहे. बारसू रिफायनरी ६२ कातळशिल्पे वगळून केली जाईल, तर १७ कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी खील निविदा काढल्या जाणार आहेत. बारसू आणि परिसरात रिफायनरी प्रस्तावित असून त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. नाणारमध्ये होणारी रिफायनरी जागा बदलून बारसू, सोलगाव, धोपेश्वर, गोवळ, शिवणे-खुर्द, देवाचे गोठणे परिसरात होणार आहे. त्यासाठी सहा हजार २०० एकर जागा लागणार असून दोन हजार ९०० एकर जमीन देण्यास लोकांनी परवानगी दिली आहे. मात्रत्यानंतर यावरून जनप्रक्षोभ उसळला होता. यानंतर आतापर्यंत प्रशासनाला तोडगा काढला आलेला नाही. याबाबत मुनगंटीवार यांनी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे याचा खुलासा झाला आहे.