
रिक्षा व्यवसायिकांना वाहतूक पोलिसांकडून होणारा त्रास थांबण्यासाठी समितीच्या अंमलबजावणीची मागणी
रत्नागिरी : स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटना पदाधिकारी व व्यवसायिक यांची एकत्रित बैठक जिल्हाध्यक्ष श्री अशोक वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या बैठकीत रिक्षा व्यवसायिकांवर पोलिसांकडून होणारी अनधिकृतपणे कारवाई यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष श्री सुहास लिंगायत,तालुकाध्यक्ष श्री अमर पाटील,शहराध्यक्ष श्री इम्रान नेवरेकर,श्री महेंद्र शिंदे,श्री सचिन रांबाडे,श्री वैभव बेंद्रे,श्री अभिजित सागवेकर, श्री रमण पुरी,श्री नितिन चेचरे,श्री अनिस बगदादी, श्री अमोल शिंदे,श्री मंदाले,श्री नवनाथ कुड,श्री मनोज जाधव आदी पदाधिकारी व रिक्षा व्यवसायिक उपस्थित होते.