
जे. के. फाइल्सजवळ महामार्गावर पाणीच पाणी
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर रत्नागिरीत जे. के. फाइल्सजवळ अनधिकृत विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे पाणीच पाणी झाले. जे. के. फाइल्सनजीक रस्त्यावर अनधिकृत विक्रेत्यांनी मांडलेल्या स्टॉल्समुळे पाणी जाण्यास अटकाव होत होता.
काल दुपारपासून पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे येथे पाणी साचू लागले. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. अशा वेळी वाहनचालकांना साचलेल्या पाण्याचा त्रास होऊ लागला. पाचदाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता.
याची माहिती मिळताच भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी याची दखल घेत आज सकाळी जेसीबीसह कामगार पाठवले. त्यावेळी प्रवीण देसाई यांनी स्वतः जातीनिशी लक्ष देत पाण्याचा निचरा होण्याकरिता प्रयत्न केले.