
समान नागरी कायदा गरज ,गैरसमज आणि वास्तव विषयावर व्याख्यान
८ जुलैला रत्नागिरीत,९ जुलैला चिपळूण येथे आयोजन
रत्नागिरी :विश्व हिंदू परिषद दक्षिण रत्नागिरी जिल्हा आणि सकल हिंदू समाज रत्नागिरी तर्फे समान नागरी कायदा गरज ,गैरसमज आणि वास्तव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आले असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद दक्षिण रत्नागिरीचे
जिल्हा मंत्री कुमार शंकर जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
. शनिवार दि.८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ०४.०० वाजता रत्नागिरी शहरातील जयेश मंगल कार्यालय येथे, तर रविवार दि.९ जुलै रोजी चिपळूण येथील माधव सभागृहात सकाळी १०.०० वा.व्याख्यान होणार आहे .या व्याख्यानात कोल्हापूर येथील जेष्ठ विधीज्ञ प्रवीण देशपांडे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याचे श्री.जोगळेकर यांनी सांगितले.
या व्याख्यानात व्याख्यान झाल्यावर उपस्थिताना प्रश्न देखील विचारण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे .याखेरीज समान नागरी कायदा या विषयासंदर्भात समाजात जाऊन जे प्रबोधन करणार आहेत अशा इच्छुकांना देखील कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास आणि आवश्यक माहिती असल्यास ती देखील तिथे दिली जाणार आहे. दरम्यान या दोन्ही व्याख्यानांना नागरिकांनी विशेषतः तरुण वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी आयोजकांनी केले.
या पत्रकार परिषदेला शंकर जोगळेकर ॲड.सचिन रेमणे , ॲड. मीरा देसाई, अविनाश जोशी, विजय यादव ,जिल्हा गोसेवा संघाचे चंद्रकांत राऊळ उपस्थित होते.