
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
रत्नागिरी :पावसाने शनिवार रात्रीपासून चांगलाच जोर घेतला आहे. रविवारी पहाटेपासून पावसाची संततधार जिल्हाभर सुरू आहे. रविवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४ तासात पावसाने सर्व तालुक्यांमध्ये दमदार पडण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ४७३ मिलिमीटर (सरासरी – ५३ मिलिमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.
पावसाने जुलै महिना सुरू होताच अधिक जोर घेतला आहे. रविवारी – पहाटेपासून पावसाने संततधार धरली आहे. मंडणगड, गुहागर आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांत मध्यम – पाऊस पडला आहे. मात्र, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या सहा तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस – लांजा आणि चिपळूण तालुक्यात झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.
खेडमधील जगबुडी नदीची पातळी तीन दिवसांपासून इशारा पातळीवर आहे. मात्र, वाशिष्ठी (चिपळूण), शास्त्री, सोनवी, काजळी (संगमेश्वर), – कोदवली (राजापूर), मुचकुंदी (लांजा) आणि बावनदी (रत्नागिरी) या नद्यांचे पात्र अद्याप कोरडे आहे. जून महिन्यात पावसाने निराशा केली असली तरी आता जुलै महिन्याचा कोटा पाऊस पूर्ण करेल, अशी शक्यता आहे.