
राजापूर – कुवेशी येथून बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला बागेत
राजापूर : कुवेशी गांवकरवाड़ी येथील ऋतिक संजय गावकर हा 16 जून सून घरातून काही न सांगता निघून गेला होता. त्याच्या अचानक गायब होण्यामुळे कुटुंबिय आणि कुवेशीवासीय हबकून गेले होते. गायब झालेल्या तरुणाचा संध्याकाळपासून त्याच्या गावातील तब्बल 50/60 तरुण परिसरातील सर्व गावे पालथे घालून शोध घेत होते. सागरी पोलीस ठाणे नाटे येथेही तात्काळ खबर देण्यात आली होती .
नाटे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉ. चव्हाण आणि सहकारी कसून शोध घेत होते. काल सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्याच कुवेशी येथील बागेमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.
मृतदेह सापडल्याची खबर लागतात संपूर्ण गावासह परिसरातून अनेकांनी कुवेशी येथे धाव घेतली . पोलीस ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
तुळसुंदे आणि कुवेशी गावातील युवकांच्या मदतीने त्याचा मृतदेह जंगल सदृश्य डोंगराळ बागेतून पोस्टमार्टम साठी खाली आणण्यात आला.
मृतदेहाशेजारी एक संशयास्पद द्रव्य असलेली बाटली मिळाल्याने ते पिऊन त्यांने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही वृत्तीने राजापूर आयटीआय मधून शिक्षण पूर्ण केले होते. आयटीआय केले असल्यामुळे जाऊन नोकरी करावी असे त्याला घरातून सांगितले जात होते मात्र तो मुंबईला जाण्यास तयार नव्हता असे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
त्याच्या बेपत्ता झाल्यानंतर अकस्मिक मृत्यूमुळे परिसरावर शोक कळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शिवविच्छेदन करून सकाळी पार्थिव देह कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्यानंतर शोकाकुल वातावरणात कुवेशी येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चव्हाण व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.