
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रत्नागिरी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन
रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस पॉलिटेकनिक कॉलेज पासून विश्वनगर भागातील रस्ता हा शहराअंतर्गत होणाऱ्या नळपाणी योजनेसाठी बरेच दिवस खोदून तसाच ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे तेथून प्रवास करणारे प्रवासी तथा स्थानिक रहिवाशी यांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
ही दुर्लक्षित केलेली गंभीर बाब राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या निदर्शनात आणण्यात आली, मुख्याधिकारी बाबर यांनी या गंभिर बाबीची दखल घेत संबंधित अधिकारी यांना जाब विचारून तसेच ठेकेदाराला लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावण्याचे आदेश दीले.
शहर व परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा व समस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वेळोवेळी आवाज उठविण्यात येत असल्याने जनतेकडून राष्ट्रवादीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
निवेदन देताना यापुढेही जनतेच्या हक्कासाठी नेहमीप्रमाणे सदैव तत्परतेने आम्ही उपलब्ध राहू असे राष्ट्रवादीचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष . नौसीन काझी , महीला शहर कार्याध्यक्ष सौ. मुनव्वर-सुलतान फरहान मुल्ला, राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते पंकज पुसाळकर यांच्या मार्फत सांगण्यात आले.