
मोदी शासनाच्या विकास पर्वात वंदे भारत ट्रेनचे रत्नागिरी मध्ये स्वागत करण्यासाठी रत्नागिरीकर उत्सुक – ॲड.दीपक पटवर्धन, भा.ज.पा जिल्हाध्यक्ष
रत्नागिरी :मोदी शासन विकास पर्वाची ९ वर्ष पूर्ण करत असताना वंदे भारत ही अत्यंत जलद व सुखावह ट्रेन मुंबई गोवा मार्गावर दिनांक ३ जून शनिवारी रोजी दुपारी २.०० वाजता येणार आहे. सकाळी ११.०० वाजता गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
वंदे भारत ट्रेन आपल्या कोकणातून धावणार आहे. विकसित भारताचे चित्र अधिक स्पष्ट करणारी ही अद्यावत ट्रेन रत्नागिरीतील रेल्वे प्रवाशांसाठी सुखकर जलद प्रवासाचे साधन ठरणार आहे. नव्या युगाची अतिजलद सुखकारी ट्रेन मुंबई – गोवा मार्गावर धावताना रत्नागिरी येथे थांबा देण्यात आला असल्याने रत्नागिरीतील रेल्वे प्रवासी सुखावले आहेत.
वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी व मोदीजींच्या विकास पर्वातील ह्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रत्नागिरीकर बांधवांनी मोठ्या संख्येने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दु.२.०० वाजता आवर्जून उपस्थित राहून वंदे भारत ट्रेनचे स्वागत करावे असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन जिल्हाध्यक्ष भा.ज.पा यांनी केले आहे.