
नागपूर महामार्ग चौपदरीकरण कामामुळे शेती जमिनींचे मार्ग बंद; ठेकेदाराचे दुर्लक्ष
रत्नागिरी :रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली, साठरे गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या ऐका बाजूची
माती खणणे व भराव करण्याचे काम गेल्या महिन्यात सुरू करून अपूर्ण ठेवून बंद करण्यात आल्याने तेथे मोठी खोल दरी सारखी परिस्थिती झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीत जाण्या येण्याचा मार्ग बंद झालेला आहे त्यामूळे त्यांना महिनाभर त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने साठरे गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या ऐका बाजूची
माती खणण्याचे करण्याचे काम गेल्या महिन्यात सुरू करून अपूर्ण ठेवून बंद केल्याने तेथे १४ ते १५ फुट उंचीची मोठी खोल दरी सारखा भाग झाल्याने लगतच्या शेतकर्यांना त्यांच्या शेती, बागायती जमिनीत जाण्या येण्याचा मार्गच बंद झालेला असल्याने त्यांची ऐन हंगामातील शेतीची कामे थांबून नुकसान होत आहे. तसेच जमिनीत बोअरवेल मारण्यासाठी वाहन नेता येत नसल्याने पाण्याचाही गैरसोय होत आहे. शिवाय चौपदरीकरण करताना आलेली माती, झाडांचे बुंधे, दगड ही घाण संपादन हद्दीच्या बाहेर शेतकर्यांच्या चांगला जागेत आणून टाकलेली असल्यानेही त्रास होत आहे.
येथील स्थानिक शेतकरी, जमीन मालक यांनी या ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींशी याबाबत फक्त लगतच्या शेती जमिनीत जाण्या येण्यासाठी तात्पुरता मार्ग करुन देण्याची विनंती केली असता गेले महिनाभर ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामूळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती जमिनीत जाण्यासाठी माती खणल्याने मार्ग बंद झालेला असल्याने हंगामातील शेतीची कामे थांबलेली असल्याने याची प्रशासनाने दखल घेऊन
ठेकेदाराकडून किमान तात्पुरता मार्ग करून देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.