
जिल्ह्यात काजू फळपिक विकास योजनेची अंमलबजावणी
रत्नागिरी :काजूच्या सर्वंकष विकासासाठी कोकणात काजू फळपिक विकास योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यातील शेतकर्यांसाठी काजूच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपिक विकास योजना 2023-24 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंअंतर्गत
अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकर्यांनी या योजनेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा,
असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले
आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी अनुदान किमान 50 गुंठे ते जास्तीत जास्त 1 हेक्टर क्षेत्र अनुदान 7 लाख 50 हजार, प्लास्टिक आच्छादनासह शेततळे सुविधासाठी अनुदान प्लास्टिक आच्छादन 75 हजार देण्यात येते.
कृषी विभाग जिल्हा परिषदेमार्फत सिंचनाकरिता विहीर 2 लाख 50 हजार प्रति विहीर, कृषी यांत्रिकीकरण योजनेमार्फत फवारणी यंत्रे,
पावरविडर, ग्रासकटर 18 हजार प्रति युनिट. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंमार्फत जुन्याबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार प्रति हेक्टर 0.20 ते 2 हेक्टरपर्यंत देण्यात येते.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमार्फत काजू प्रक्रिया उद्योग आधुनिकीरणासाठी सर्वसाधारण क्षेत्र 40 टक्के कमाल 10 लाख व डोंगराळ अधिसूचित क्षेत्र 35 टक्के कमाल 13 लाख 75 हजार
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत पॅकहाउस व ड्राईंग यार्ड उभारणीसाठी अनुदान सर्वसाधारण क्षेत्र 35 टक्के कमाल 10 लाख व डोंगराळ अधिसूचित क्षेत्र 50 टक्के कमाल 25 लाख देण्यात येते.
यासाठी शेतकर्यांनी महाटीबीटी संकेतस्थळावर ऑलाईन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज हा महा ई-सेवा केंद्र अथवा कृषी विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयातून करता येईल. त्यासाठी अर्जासोबत सातबारा, 8 अ, बँक पासबूकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडून अर्ज ऑनलाईन करायचा आहे.