
बारसू प्रकरणी ३२६ जणांवर कारवाई
रत्नागिरी:- माती परिक्षण सुरु असताना बारसू रिफायनरी विरोधी आंदोलकांवर गेल्या सतरा दिवसांमध्ये पोलिसांनी सुरवातीला चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर कलम १४४-२ नुसार वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून ३२६ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी ७ जणांवर ३५३ चा गुन्हा दाखल केला होता. तो मागे घेण्यात आला. गुन्हा दाखल करताना गयावाया करणारे आणि शेतीच्या कामांची कारणे देणारे दुसऱ्या दिवशी आंदोलनात दिसायचे, अशी प्रवृत्ती दिसून आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.