
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत जिल्ह्याला ४ कोटी ३८ लाख
रत्नागिरी :एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 साठी जिल्ह्याला रक्कम रूपये 4 कोटी 38 लाख रुपयांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विविध बाबींचा समावेश आहे.
उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका, क्षेत्रविस्तार, पुष्पोत्पादन, फळपिके, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, मुनष्यबळ विकास कार्यक्रम, काढणीत्तोर व्यवस्थापन आणि पणन सुविधा इ. विविध बाबींचा समावेश आहे. यामधे या वर्षी प्रामुख्याने मधुमक्षिका पालनासाठी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सहभागी घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्यानजिकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा ऑनलाईन अर्ज करता येऊ शकेल. शेतकर्यांनी योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडल कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा.