
काँग्रेसचा भाजपा सरकारच्या विरोधात एल्गार
रत्नागिरी : मा. खाजदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाजपा सरकारने सुडबुध्दीने खाजदारकी रद्द करून विरोधी पक्ष चा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल संपूर्ण देशात आंदोलन होत असताना रत्नागिरी जिल्ह्यात सुधा सिव्हील हस्पिटल समोरील आंबेडकर पुतळया समोर निदर्शने करण्यात आली. त्यावेळेस तब लढे थे गोरोसे अब लढेंगे चोरोसे, राहुल गांधी संगर्ष करो हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा विजय असो, मोदी सरकार हाय हाय, अश्या घोषणांनी सदर परिसर दणाणून गेला होता. तदप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत,सोशल मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर ,महिला जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हरीश शेकासन,वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष रघुनाथ अडीवरेकर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर, महिला तालुकाध्यक्ष रिजवणा शेख, रमेश शहा, रवींद्र खेडेकर, युवक काँग्रेसचे चेतन नवरंगे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते