
महामार्गावर ओव्हरब्रिज अजूनही अपूर्णच
खेड
मुंबई- गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हा एक आता गांभीर्याने न घेणारा विषय झाला आहे. हा महामार्ग अजून किती वर्षांनी पूर्ण होणार याविषयी बांधकाम मंत्री ही ठाम तारीख सांगू शकत नाहीत. एवढे निराशजनक चित्र मुंबई-गोवा महामार्ग विषयी झाली आहे. गेली १३ वर्ष हा रस्ता आणि ह्या रस्त्यावर काम सुरु आहे. एव्हढेच बोर्ड पहायला मिळत आहेत.
पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर असा ८४ किमीचा रस्ता काम करण्यासाठी दोन ठेकेदारमध्ये विभागला होता. मात्र दोन्ही ठेकेदारांनी काम वेळेत पूर्णतर केले नाहीच शिवाय केलेल्या कामात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत.
वडखळ ते कोलाड अंतरात अजुनही गडव येथील ब्रिजचे काम पूर्ण होण्यास दोन महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. तर कोलेटी आणि नागोठने, कोलाड येथील ब्रिज व तेथील भू संपादन याबाबतचाविषय क्लिअर झालेला नसल्याने तेथील काम अजूनही अपूर्णच आहे. अजूनही पुढील सहा महिन्याचा कालावधी हे ब्रिज पूर्ण होण्यासाठी जाण्याची शक्यता आहे.
पळस्पे ते कोलाड इंदापूर या पहिल्या टप्यात महामार्ग पूर्णत्वास जात असला तरी रस्त्याच्या मधोमध झाडे लावणे. पळस्पे ते कोलाड इंदापूर मार्गावर लाईट, झाडे, ब्रिज अपूर्ण चपळस्पे ते कासू व पुढे कोलाड इंदापूर मार्गावर बहुतांश ठिकाणी रस्ता पूर्ण झाल्याचे चित्र उभे करण्यात आले असले तरी वडखळच्या पुढे गडब, कोलेटी, नागोठणे, कोलाड, येथील ओव्हरब्रिज चे काम पूर्ण होण्यास अजून सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यामुळे वरील ठिकाणी अजूनही प्रवाशांचा वाहतूककोंडीत वेळ वाया जात आहे. या तिन्ही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. तर ज्या ठिकाणी एकेरी वाहतूक आहे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक असल्याने वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण झाला आहे त्या ठिकाणी लाईट पोल लावणे गरजेचे होते. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या साईडपट्टीला काही ठिकाणी खड्डे आहेत तर काही ठिकाणी रेती, खडी पडली आहे. यामुळे वाहन चालविणे अवघड बनले आहे.
अजूनही कोलेटी, नागोठणे या ठिकाणी सर्व भार पेव्हरब्लॉक उचलीत आहेत. पण हे पेव्हरब्लॉक किती वर्ष राहणार याचा अंदाज ठेकेदार कंपनीला नाही त्यामुळे आज पेव्हरब्लॉकच्या जागी केवळ खड्डे पडले आहेत व हा रस्ता एकेरी वाहतुकीवर असल्याने दररोज रांगा लावुनच वाहन चालक मार्ग क्रमण करीत आहेत.
झाडे लावणेबंधनकारक असतानाही अजूनही झाडे लावली नाहीत. काही ठिकाणी स्थानिक कंपनीच्या हद्दीत कंपनीने पुढाकार घेऊन झाडे लावून ती जोपासली आहेत. मात्रठेकेदाराने झाडे न लावल्याने रस्ता ओसाड आणि भकास दिसत आहे. रस्त्यावर उभे राहण्यास देखील एखादे झाड नसल्याने कडक उन्हात प्रवास करावा लागत आहे.