
कामगार सहाय्यता योजनेअंतर्गत २५ कामगारांसह १५ कामगार कुटुंबीयांना ८ लाख अदा
चिपळूण:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात २६ हजार इतकी सर्वसाधारण सभासद नोंदणी झाली आहे. या मंडळाच्या शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, एमएससीआयटी, टंकलेखन व पाठ्यपुस्तक या योजनेअंतर्गत ३०० सभासदांनी अर्ज सादर केले होते. तसेच गंभीर आजार सहाय्यता योजनेअंतर्गत २५कामगार व १५ कामगार कुटुंबीयांना एकूण ८ लाख रुपये एनएफटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. एकंदरीत या मंडळाच्या योजनेचा कामगारांना हातभार मिळत आहे. याबाबतची माहिती गट प्रमुख कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड यांनी दिली आहे.
शासनाने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये कामगार कल्याण मंडळ योजनेअंतर्गत देखील कामगार, त्यांच्या कुटुंबीयांच्या, पाल्यांच्या शैक्षणिकतेमध्ये देखील मोठा हातभार लावला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अन्वये पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार किंवा कर्मचारी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील दुकाने, कंपन्या, कारखाने, बँका, हॉटेल्स, टूर अँड ट्रॅव्हल्स, दुग्ध महासंघ, एस.टी. महामंडळ, वीज कंपन्या, पतसंस्था, जीवन प्राधिकरण, आयुर्विना महामंडळ, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, बेकरी उद्योग इत्यादी मध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी २०२४-२५ व त्यापुढील आर्थिक वर्षाकरिता मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेश शिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, गंभीर आजार, एमएससीआयटी आदी आर्थिक लाभाच्या योजनेत करता मंडळाच्या कामगारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मंडळाकडून गेले अनेक वर्ष कामगार व कामगार पट्टीमेंसाठी ऑफलाईन पद्धतीने वरील सर्व योजना राबवण्यात येत होत्या. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून मंडळाने स्वतःचे WWW.public.mlwb.in हे पोर्टल सुरू केलेले आहे. तसेच महाकल्याण हे ॲप देखील विकसित करण्यात आलेले आहे. या मार्फत कामगार स्वतःसाठी व आपल्या पाल्यांसाठी मंडळाने जाहीर केलेल्या आर्थिक लाभाच्या योजना घरी बसून मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. मंडळाने प्रथम टप्प्यात स्थापना मालक यांना ऑनलाईन द्वारे मंडळाकडे नोंदणीकृत होण्यासाठी व दुसऱ्या टप्प्यात कामगार व कामगार कुटुंबीयांसाठी मंडळाच्या सर्व सोयी सुविधा तसेच आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ त्यांना ऑनलाईन द्वारे मिळवून देण्यासाठी प्रशासकीय कामकाज पूर्ण केले आहे.
तरी चिपळूण गटांतर्गत रत्नागिरी रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या जून/ डिसेंबर या महिन्यामध्ये २५ रुपये व मालकाचे ७५ रुपये प्रमाणे एका प्रत्येक कामगारास देण्यात आलेला लिन नंबर हा त्याचा युजर नेम म्हणून आणि सदर कामगारांनी आपल्या आस्थापनेकडे रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर हा त्यांचा पासवर्ड म्हणून मंडळाकडे असलेल्या सोयी सुविधांचा आर्थिक लाभाच्या योजना ऑनलाईन द्वारे पोर्टल द्वारे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन कामकाज करताना वापरायचा आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांनी मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन लाभ घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत अर्ज करावेत. यामध्ये अर्ज सादर करण्याची दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण मंडळ तर्फे आवाहन करण्यात आले आहे.