
कळसवली ग्रामपंचायतीचा उपक्रम; गावात शंभर टक्के शोष खड्डे उभारणार
रत्नागिरी
कळसवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत ३८२ कुटुंबे आहेत. गावातील सर्व कुटुंबांचे सांडपाणी शोष खड्ड्यातच जावे यासाठी महिला बचत गटांच्या सहाय्याने गावात सर्व कुटुंबांकडे शोषखड्डे बांधण्याचा संकल्प ग्रामपंचायतने केला आहे.
१ जानेवारी २०२५ रोजी महिला बचत गटाच्या मदतीने या कामाची सुरुवात करण्यात आली. त्यासाठी गावातील प्रत्येक वाड्यामध्ये महिलांच्या सभा आयोजित करण्यात आल्या. या सभांदरम्यान माझी वसुंधरा अभियानाच्या पाच तत्त्वावर जनजागृती सुद्धा करण्यात आली. नवीन वर्षाचा नवा संकल्प करून १ जानेवारी पासून आज पर्यंत ३ वाड्यांमधील शोषखड्डे पूर्ण करण्यात आले. यासाठी महिलांचे अमूल्य योगदान ग्रामपंचायतला मिळाले तसेच माझी वसुंधरा अभियानामध्ये कळसवली ग्रामपंचायत च्या सर्व महिला समूहाचा सक्रिय सहभाग आहे. यासाठी ग्रामपंचायत कळसवली कडून सर्व महिलांचे विशेष आभार.