
गंगातीर्थ विकासाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार
पर्यटन विकासमधून एक कोटी “मंजूर
राजापूर : तालुक्यातील प्रसिद्ध उन्हाळे येथील गंगातीर्थ क्षेत्र विकासाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि गंगापुत्र यांची संयुक्त समन्वय समिती गठित करून त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली गंगातीर्थ विकासाची कामे मार्गी लावण्याचा निर्णय बुधवारी (ता. २६) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला आमदार किरण सामंत उपस्थित होते. त्यांनी यशस्वी तोडगा काढला आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे रखडलेले गंगातीर्थ विकासाचे काम आता मार्गी लागणार आहे. तसेच लवकरच गरम पाण्याचे कुंडस्थळ विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली. तालुक्यातील उन्हाळे येथील प्रसिद्ध असलेल्या गंगातीर्थ क्षेत्राचा विकास व्हावा, अशी गेली कित्येक वर्षे स्थानिक ग्रामस्थ, गंगापुत्र व पर्यटकांची मागणी आहे. यासाठी शासनाच्या पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे; मात्र तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले होते. यावर आमदार सामंत यांनी स्थानिक ग्रामस्थ, गंगापुत्र व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली.
स्थळाचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय 66 राजापूर तालुक्यातील एक जागृत व प्रसिद्ध असे हे पर्यटनस्थळ आहे. या स्थळाचा सर्वांगीण विकास करणे हेच सर्वांचे ध्येय आहे. दोघांनाही विश्वासात घेऊन आणि समन्वयातून येथील विकासकामे मार्गी लावली जातील. असे प्रतिपादन लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी केले.