
बाष्टे कंपाऊंड येथे विहिरीत पडलेल्या पाड्याला जीवदान
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पटवर्धन वाडीतील बाष्टे कंपाऊंड मधील विहिरीत पाडा पडल्याचे भाजपा किसान मोर्चाचे प्रसाद बाष्टे यांच्या रविवारी सकाळी निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश पोतकर यांच्याशी संपर्क साधून सदर बाब सांगितली.
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश पोतकर यांनी ही बाब तात्काळ प्राणीमित्र श्री.रोहन वारेकर यांच्या कानावर घालून, तात्काळ सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेच्या राजेश आयरे यांनाही संपर्क केला. तसेच पत्रकार योगेश हळदवणेकर यांच्यामार्फत रत्नागिरी नगरपालिकेतील अधिकारी श्री.इंद्रजीत चाळके यांना तात्काळ संपर्क करून त्यांच्यामार्फत रत्नागिरी नगरपालिकेची अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले.
घटनास्थळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पोतकर तसेच गोशाळेचे राजेश आयरे दाखल झाले. स्वतः किसान मोर्चाचे शहराध्यक्ष प्रसाद बाष्टे जातीनिशी हजर होतेच पण त्यांनी विशेष जबाबदारी स्विकारताना यंत्रणेला मदत करण्यात मोठी जबाबदारी घेतली होती. त्यांच्यासोबत श्री.राजेश आयरे यांनी जेसीबीची व्यवस्था केली. याठिकाणी दिलीप बाष्टे, श्रीम.पद्मा पटवर्धन, शंकर कारवे हे मदतीला होते. यावेळी रत्नागिरी नगरपालिकेची अग्निशामक दल तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशामक दल सुद्धा दाखल झाले.
तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पाड्याच्या भोवती सेफ्टी बेल्ट बांधुन जेसीबीच्या आणि अग्निशामक त्यांनंतर पद्मा पटवर्धन यांच्या भारत एजन्सीच्या टेम्पोने सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेत श्री. राजेश आयरे यांच्या मार्फत नेण्यात आले.
यावेळी रत्नागिरी अग्निशामक दलात नरेश मोहिते, रमेश नार्वेकर, श्रीकृष्ण ढेपसे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामक दलामध्ये आनंद राऊत, दिलिप दळवी, राजु मुळे, राकेश बाबर, प्रमोद राठोड यांनी उत्तम कर्तव्य बजावले.