
आजारपणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी : राजापूर-साखर येथे फिट येण्याच्या आजाराला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपेश कृष्णा राज्ये (३२, रा. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३०च्या सुमारास साखर आंबेरवाडी येथील राहत्या घरी घडली. रुपेश याला लहानपणापासून फिट येण्याचे आजारपण होते. आजारपणाला कंटाळून त्याने घरात कुणीही नसल्याचे पाहून स्वतःहून नायलॉन रस्सी घराच्या मागील पडवीत छताच्या लोखंडी वाशाला रस्सी बांधून गळफास घेतला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.