
जिल्ह्यात ५ उमेदवारांची ७ नामनिर्देशनपत्र दाखल
रत्नागिरी, :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात चौथ्या दिवशी तीन मतदार संघात ५ उमेदवारांनी ७ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.*
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी दाखल झालेल्या विधानसभा मतदार संघनिहाय नामनिर्देशन पत्रांची माहिती पुढीलप्रमाणे..
265- चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये अनघा राजेश कांगणे – अपक्ष आणि महेंद्र जयराम पवार – अपक्ष यांनी प्रत्येकी 1 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
266- रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये उदय रविंद्र सामंत – शिवसेना यांनी 3 आणि ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील – अपक्ष यांनी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
267- राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये अविनाश शांताराम लाड – इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी त्यांचे सूचक प्रदीप यशवंत गुरव आणि प्रतिनिधी महेंद्र नलावडे यांच्यामार्फत 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.