
पुन्हा महायुतीचे सरकार, मतदारसंघाच्या विकासासाठी भैय्या सामंत यांच्या पाठीशी रहा – प्रमोद सावंत
राजापूर (प्रतिनिधी):
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे भविष्यात या मतदार संघाच्या सर्वांगिण अशा विकासासाठी आणि विकसित महाराष्ट्रासाठी राजापूर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा आणि त्यांना मोठया मताधिक्क्याने निवडून द्या असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित महायुतीच्या भव्य मेळाव्यात संबोधीत करताना केले. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व जागा महायुती जिंकेल आणि कोकणच्या विकासाला आणखी गती मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची निर्मिती होत असून या विकसित भारतात महाराष्ट्र हे एक प्रगतशिल आणि विकसित राज्य आपल्याला पहायाचे आहे. यासाठी आपण सगळयांनी भक्कमपण महायुतीच्या उभेदवारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि राज्यात पुन्हा एकदा विकासाची यशस्वी घौडदौड कायम राखण्यासाठी किंबहुना अधिक वेगाने होण्यासाठी आपल्या भागातुन महायतीचे उमेदवार असलेले किरण सामंत यांना निवडून द्यावयाचे आहे असे ना. सावंत यांनी नमुद केले. तालुक्यात आणि जिल्हयात एक दोन लोक इकडून तिकडे गेले म्हणून काही फरक पडत नाही असे नमुद करताना महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या पाठीशी भाजपा ठामपणे व भक्कमपणे उभा राहिल अशी ग्वाहीही ना. सावंत यांनी दिली.राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघातून सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी महायुतीच्या वतीने आपला उमेदवारी गुरूवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी शहरातील पाटीलमळा येथील यशोदिन सृष्टी सभागृहात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री ना. बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार किरण सामंत, पक्ष निरीक्षक आमदार रविंद्र फाटक, उद्योजक रवींद्र उर्फ आण्णा सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कूरूप, उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, भाजपा महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस शिल्पा मराठे, भरत लाड, शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, भास्कर सुतार, प्रकाश कुवळेकर, बंटी वणजू, महिला आघाडीच्या शिल्पा सुर्वे, शुभांगी डबरे आदी मान्यवर उपस्थीत होते.या प्रसंगी बोलताना ना. सावंत यांनी गेल्या अडीज वर्षात केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात जलदगतीने झालेल्या विकासाची माहिती देताना अनेक महत्वांकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचे नमुद केले. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला डबल गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या मतदार संघातून किरण सामंत यांना निवडून देवून राजापूरचा रखडलेल्या विकासाला न्याय देण्यासाठी कटिबध्द व्हा असे आवाहन केले.राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघात जो खुंटलेला विकास आहे. त्याला डबल इंजिनच्या माध्यमातून गती देण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डबल इंजीनचे सरकार आणून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी या मतदार संघातून महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना मताधिक्याने निवडून दया असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित महायुतीच्या भव्य मेळाव्यात संबोधीत करताना केले. राज्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने सन 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी गती दिली. मात्र सन 2019 च्या निवडणूकीत जनतेने महायुतीला कौल दिलेले असतानाही उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस व तत्कालीन राष्ट्रवादी पक्षाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. मात्र या अडीज वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास खुंटला, कोकणवरही अन्याय झाला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने राज्यात महायुतीचे सरकार आणले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासाची घौडदौड सुरू झाली, ना. शिंदे, ना. फडणवीस व ना. पवार यांनी या अडीज वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली. मोठे प्रकल्प मग यामध्ये रस्ते, मेट्रो यांना गती दिली. औद्योगिक प्रगती साधताना राज्याला अव्वल स्थानी नेले. तर लाडकी बहिण, बळीराजा, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वेगवेगळया योजना राबविताना विकसित महाराष्ट्र बनविण्याचा या सरकारने प्रयत्न केला आहे. त्यामुळे विकासाची ही घौडदौड कायम राखण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा राज्यात आपले महायुतीचे सरकार आणावयाचे आहे. त्यासाठी आपल्याला या मतदार संघातुन महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना मोठया मताधिक्क्याने निवडून द्यावयाचे आहे हे लक्षात ठेवा आणि आत्तापासून कामाला लागा असा कानमंत्र यावेळी दिला.