
विजेचा खांब कोसळून दुचाकी वरील दोघेजण जखमी
चालत्या दुचाकी वर विजेचा खांब कोसळून दोघेजण जखमी
रत्नागिरी : शहरातील पऱ्याची आळी येथे रस्त्यावरून जाणाऱ्या चालत्या दुचाकी वर विजेचा खांब कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. खांब कोसळताना विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. मात्र अंगावर खांब पडून दुचाकी वरून जाणारे दांपत्य जखमी झाले आहे. या घटनेत दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी महावितरणचे अनेक खांब गंजलेल्या स्थितीत असून महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे. आज झालेला अपघात जर दुपारच्या वेळी घडला असता तर दुपारच्या वेळेस बाजारात असणाऱ्या गर्दीमुळे मोठी दुर्घटना घडली असती.