
‘चित्पावन ब्राह्मण’मध्ये शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा नुकताच मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात झाला. यावेळी (कै.) ल. ग. पटवर्धन विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक भे देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी (कै.) ल. ग. पटवर्धन विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे यांनी सांगितले की, तुम्ही सर्व विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही वर्षांनीही तुम्हाला हुषारच म्हटले जाणार आहे. तुमच्याबद्दल चांगलंच बोललं जातं. कारण तुम्ही हे मेहनतीने यश मिळवले आहे, हे यश टिकवणंसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. नोकरी केलं, पैसे मिळवले, सुख मिळवलं एवढं आयुष्यात असू नये. देशासाठी काय देऊ शकतो, याचाही विचार करा. आपण ज्या देशात, समाजात राहतो, त्याचंही देणं लागतो, ही भावना मनात निर्माण होऊन योगदान दिले पाहिजे.
कार्यक्रमाला व्यासपीठावर संस्थेच्या उपाध्यक्ष स्मिताताई परांजपे, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कोषाध्यक्ष सौ. राधिका वैद्य, सदस्य अविनाश काळे, डॉ. संतोष बेडेकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना गोष्टी देशप्रेमाचे संस्कार करणारी पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. सौ. राधिका वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी जोशी यांनी चित्पावन मंडळाच्या परतफेड शिष्यवृत्ती, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहाची माहिती दिली. तसेच १३ वर्षे होत असलेला कीर्तन महोत्सव, मंडळाची शतक महोत्सवाकडे वाटचाल याविषयी विस्तृत माहिती दिली. अविनाश काळे यांनी आभार मानले.