
चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी : दहीहंडी पाहून घरी आलेला प्रौढ घरी बसलेला होता. अचानक त्याला चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अविनाश अनिल चव्हाण (४१, रा. बेलबाग, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २७) रात्री साडेनऊच्या सुमारास खासगी रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अविनाश चव्हाण हा दहीहंडी पाहून घरी आलेला होता. घरात बसलेला असताना अचानक त्याला चक्कर आली. बेशुद्ध अवस्थेत त्याला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.