
रत्नागिरीत आज हिंदू गर्जना मोर्चा
रत्नागिरी : बांगलादेशात सध्या होत असलेल्या हिंदू धर्मियांवरील अत्याचार, नरसंहार आणि अलिकडे भारतात वाढलेल्या मुलींवरील अत्याचारच्या घटनांच्या निषेधार्थ रत्नागिरीत आज सकाळी 10 वाजता हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन केलेले आहे. हा मोर्चा मारुती मंदिर रत्नागिरी येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात येणार आहे. तसेच यादिवशी दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून रत्नागिरी बंदची हाक देण्यात आली आहे.
येथील जागृत हिंदू समाज रत्नागिरीच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय जोशी, राकेश नलावडे, गणेश गायकवाड, तनया शिवलकर आदी उपस्थित होते.
जोशी म्हणाले की, बांग्लादेशात हिंदूना घरात कोंडून आग लावणे, हिंदूना लटकवून मारणे. हिंदूंची घरे जाळली जात आहेत. स्त्रियांवर अनन्वित अत्याचार, बलात्कार केले जात आहेत. धर्मपरिवर्तन करा, देश सोडा किंवा मरायला तयार व्हा, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत आहेत. बांग्लादेशवरील यु.एनओ.च्या अहवालानुसार 1971 साली 20 लाख हिंदूंना मारले गेले, 1992 साली 28 हजार हिंदूंची घरे जाळण्यात आली 250 स्त्रियांवरती अत्याचार करण्यात आले. आजपर्यंत अंदाजे 650 हिंदूंना मारले गेले आहे. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून या मोर्चाचे आयोजन केलेले आहे. यामध्ये सर्व रत्नागिरीकरांनी सामील व्हावे असे आवाहन संजय जोशी, राकेश नलावडे यांनी केले आहे.