
ओबीसी समाजाला न्याय देणार: भाई जठार
रत्नागिरी:- ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मेहनत घेणार आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष भाई जठार यांनी केले.
स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित भाजपाच्या मेळाव्यात जठार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी मंत्री तथा भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा सत्कार केला. जठार यांनी ओबीसी नेते शामराव पेजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कामाला सुरवात केली आहे. जठार हे १९९८ पासून ते राजकारण, समाजकारणात कार्यरत आहेत. ते लांजा तालुकाध्यक्ष होते. सध्या लांजा तालुका प्रभारी आहेत याशिवाय दिलासा ट्रस्ट, भाई जठार मित्रमंडळाचे पदाधिकारी आहेत. हातखंबा, निवळी परिसरामध्ये महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करणे, अपघात झाल्यास जखमींना ताबडतोब मदतीसाठी ते धावून जातात. भाई जठार यांनी माळनाका येथे (कै.) शामराव पेजे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्या प्रसंगी राजीव कीर, संतोष बोरकर, नीलेश आखाडे, डॉ. ऋषिकेश केळकर, गुरूप्रसाद फाटक, राजू भाटलेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.