
रत्नागिरी शहरवासीयांना लवकरच प्रायोगिक तत्त्वावर होणार 24 तास पाणीपुरवठा
रत्नागिरी : नवीनच टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या लाईनच्या माध्यमातून रत्नागिरी नगर नगरपरिषद प्रायोगिक तत्त्वावर पावसाळ्यामध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या संदर्भात नियोजन करत आहे,रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला आहे.आज या संदर्भात मुख्याधिकारी बाबर ,पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर भोईर,जितेंद्र विचारे यांच्याबरोबर बैठक पर पडली,व कर्मचारी वर्गाचे,पाणीपुरवठ्यासंदर्भात पूर्ण नियोजन करून ह्या पावसाळ्यात शहरवासियांना 24 तास पाणी पुराविण्यात येईल असेसांगण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर ,शहराध्यक्ष निलेश भोसले,उपाध्यक्ष सानिफ गव्हाणकर,सईद पावसकर,बबन आंबेकर,मकबूल म्हाद्रे उपस्थीत होते.