
औसवाल नगर ते उद्यम नगर रस्ता एखादा मोठी घटना घडण्याची बघतोय वाट
रत्नागिरी: रत्नागिरी शहरा जवल असलेल्या औसवाल नगर ते उद्यम नगर रस्ता हा गेल्या कित्येक वर्षापासून जैसे थे या परिस्थितीत आहे.
या रस्त्याच्या एका बाजूला रत्नागिरी नगर परिषद आहे. तर एका बाजूला शिरगाव ग्रामपंचायतीचा काही भाग येतो. त्यामुळे खरोखरच हा रस्ता कोणाच्या हद्दी येतो हे समजून येत नाही. काही वेळेला शिरगाव ग्रामपंचायत मार्फत या रस्त्यावरती डाग -ढुगी केलेली पाहायला मिळते. पण पावसाळा चालू होऊन देखील दोन महिने होत आले असले तरी म्हणावे तसे या रस्त्यावरती कुणाचेच लक्ष गेलेले दिसत नाही. खरोखरच हा रस्ता एक प्रकारे मृत्यूचा सापला म्हणून ओळखला जात आहे. या रस्त्यावरून विद्यार्थी वर्गांचा तसेच या परिसरातील राहणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात येणे जाणे असते त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्यासाठी योग्य प्रकारे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अशी या भागातील लोकांची मागणी आहे. निवडणुका आल्या की या भागातील लोकांची आठवण होताना दिसते. पण या रस्त्यावर मुळे होणाऱ्या त्रासाला जनता कंटाळली असून योग्य वेळी योग्य विचार करू असेही काही लोक म्हणत आहेत.
आज सकाळी मुसळधार पावसामध्येच या भागातून जाणाऱी शालेय विद्यार्थिनी रस्त्यावर पडली . नेहमी या रस्त्यावरती वयोवृद्ध लोक, असतील किंवा स्त्रिया यांचा छोटा मोठा अपघात होत असतो. खरोखरच हा रस्ता एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट तर पाहत नाही ना? असेही बोलले जात आहे