
महावितरण रत्नागिरी मंडळ अधीक्षक अभियंतापदी पाथोडे रूजू
रत्नागिरी:- महावितरण रत्नागिरी. मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी पदोन्नतीने वैभव पाथोडे नुकतेच रुजू झाले आहेत. ते भंडारा तालुक्यातील लाखनीचे मूळ रहिवासी आहेत.
पाथोडे यांचे शिक्षण विद्युत अभियांत्रिकी शाखेत पदवी व व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर पदवीपर्यंत झाले आहे. पायोडे हे सन २००७ ला महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंतापदावर रुजू झाले. सन २००८मध्ये सरळसेवा भरतीतून अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची निवड झाली. नांदेड, ब्रम्हपुरी, भंडारा येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. २०१७ मध्ये पदोन्नतीने कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. नागपूर येथे कार्यकारी अभियंता म्हणून सेवा बजावली. अमरावती (शहर) चाचणी विभाग येथे येथे कार्यरत असताना सरळसेवा भरतीत अधीक्षक अभियंतापदावर त्यांची निवड झाली आहे.