
आमदार मा.राजन साळवी यांचा पूल पाहणीचा दौरा म्हणजे फक्त देखावा.मनसेने सुनावले खडे बोल..
गेले वर्षभरापासून चालू असलेला राजापूर सागरी महामार्गावरील अणसुरे दांडे पुलाची आमदार राजन साळवी यांनी नुकतीच पाहणी केली.
आणि त्यात आमदार महोदयांनी सांगितले की काम पुर्ण न झाल्यास आंदोलन करू.अहो आमदार साहेब काम पुर्ण होत आलय.आणि आता आंदोलनाचा ईशारा कसला देताय.
वेळोवेळी मनसेचे तालुका अध्यक्ष पंकज पंगेरकर यांच्या नेतृत्वाखाली आढावा घेऊन सबंधीत अधिकार्यांना धारेवर धरत काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आणि मनसेच्या ईशार्यानंतरच पंधरा दिवसापुर्वीच मनसेला सबंधीत खात्याने येत्या ३० जून पर्यंत काम पुर्ण होऊन पुल वाहतूकीस चालू होईल अशी ग्वाही दिली आहे.
आमदारांवरतीच आंदोलन करण्याची वेळ कशी येऊ शकते ?
मग आपण याआधी का नाही त्याबबत सबंधित खात्याला जाब विचारलात.
आणि आता काम पुर्ण होते वेळी तीथे येऊन देखावा निर्माण करीत आहेत.
असे परखड मत मनसेचे सागवे जि.प.उपतालूका अध्यक्ष- राकेश कणेरी यांनी व्यक्त केले आहे.