
राज्यात समुद्री मच्छीमारीत २४ टक्क्यांची वाढ
रत्नागिरी दुसर्या क्रमांकावर; ३३.९१ टक्के एवढा सहभाग
रत्नागिरी : सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रामध्ये समुद्री मच्छीमारीत वाढ झाल्याची आकडेवारी सीएमएफआरआयने जारी केली आहे. २०२२ मध्ये १.७ लाख टन उत्पादन नोंदवण्यात आले. ते २.११ लाख टनावर जाऊन पोहोचले. एकूण २४.३ टक्के एवढे उत्पादन वाढले.
केंद्र सरकारच्या संस्थेने नियमितपणे मच्छीमारीचे सर्वेक्षण करुन आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे की, मुंबई शहर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक समुद्री मच्छीमारी झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. राज्यात पकडलेल्या मच्छीपैकी मुंबई बंदर अव्वल, ३३.९१ टक्के एवढा रत्नागिरीचा तेथील सहभाग आहे. तिसरा क्रमांक रायगड जिल्ह्यात २१.१६ टक्के एवढे मासे सापडले. रत्नागिरी जिल्ह्यात २०.९८ टक्के एवढे मासे सापडले. गोवा, दमण आणि दीवमध्ये अनुक्रमे १६.८ आणि २३.२ टक्के एवढी मासेमारीत वाढ झाली. दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यामध्ये मासेमारीत घट झाली. अखिल भारतीय स्तरावर मच्छीमारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशातील मच्छीमारीमध्ये महाराष्ट्राचा वाटा पाचव्या क्रमांकावर होता. ५.९८ टक्के एवढी मच्छीमारी येथे झाल्याचे दिसून येते. सारडीन माशाचे उत्पादन ३ पटीने वाढले. ते १३ हजार टनापर्यंत पोहोचले. मॅक्रेलचे उत्पादन दुप्पट होऊन ते ४३ टक्के झाले. रीबन फीश कोळंबी हेही मासे सापडले. सारडीन किंवा तारली माशांमध्ये घट झाली. महाराष्ट्रातील मच्छीमारीत पर्ससीनचा वाटा मोठा होता. त्यानंतर बहुदिवशीय ट्रॉलनेट व यांत्रिकी डोलनेटने मच्छीमारी केली. तामिळनाडूत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये चक्रीवादळ झाले. त्यामुळे तेथे मच्छीमारी घटली.