जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक बाल मजूरी विरुध्द दिवस साजरा. मा. श्री. सुनिल एस. गाेसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांचे संकल्पनेतून व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी श्री. निखिल जी. गाेसावी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जून, २०२४ रोजी जागतिक बाल मजूरी विरुध्द दिवसाच्या अनुषंगाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये बाल मजूरी रोखण्यासाठी पाेस्टरव्दारे जनजागृती करण्यात आली. रॅलीमध्ये प्रचंड संख्येने अंगणवाडी सेविका यांनी सहभाग घेतला. त्यांचेमार्फत बालमजूरी संदर्भात घोषणा देण्यात आल्या. सदरची रॅलीचा प्रारंभ व शेवट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांचे कार्यालयातून होवून सदरची रॅली रत्नागिरी शहरातील प्रमुख ठिकाणांवरुन काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी कार्यालयामार्फत लोक अभिरक्षक कार्यालय, रत्नागिरी मधील उप मुख्य लोक अभिरक्षक, श्री. उन्मेश मुळये, सहाय्यक लोक अभिरक्षक, श्री. यतीन धुरत, श्री. गौरव भाटकर हे उपस्थित होते. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांचे कार्यालयातील श्री. श्रीकांत हावळे, जि. म. बा. वि. अधिकारी, श्रीम. समृध्दी वीर, जि. बा. सं. अधिकारी, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक श्रीम. अन्वी शिंदे आदी मान्यवर उपस्थित हाेते.