
खून प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी:- खून प्रकरणातील आरोपी अक्षय राजू साळवे याचा जामीन अर्ज रत्नागिरी येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
संगमेश्वर पोलीस स्थानकात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अक्षय साळवे हा तीन नंबरचा आरोपी म्हणून त्याने नियमीत जामिनासाठी अर्ज दाखल केला. २७ सप्टेंबर २०२३ ला रेल्वे रुळाच्या शेजारी मोहम्मद साजिद इस्माईल अन्सारी रा. मुंबई मृतदेह सापडला. या प्रकरणात अक्षय याला जामीन मिळावा म्हणून अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधिश अनिलकुमार आंबळकर यांच्या समोर सुनावणीस आला. त्यांनी हा जामीन अर्ज फेटाळून लावल्याचा निर्णय दिला.