
राज्याचे मत्स्यव्यवसाय बाबतीत विवीध धोरण ठरवणाऱ्या तांत्रीक समितीत रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाला स्थान.
रत्नागिरी मनसेच्या प्रयत्नांना यश.
रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचा (तथाकथीत) घोषित केलेला राज्यमास्याचे जतन तथा लहान मासळीच्या मासेमारीवरील आळा घालून शाश्वत मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी एक तांत्रिक समिती गठीत करण्याचे मत्स्य खात्याकडुन जाहीर केले होते. सदर समिती मध्ये संपूर्ण कोकणातील एकमेव रत्नागिरीचे मत्स्य महाविद्यालयाला स्थान देण्यात आले नव्हते. ही बाब रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या मनसे नेते अविनाश जाधव व अभिजीत पानसे यांच्या मत्स्य विद्यापीठ मागणी लावून धरणारे माजी शहर अध्यक्ष अरविंद मालाडकर शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी नाविकसेना राज्य सल्लागार प्रवीण गोळवणकर जिल्हाचिटणीस बिपिन शिंदे व जिल्हा संघटक जयंत कोठारकर यांनी लक्षात आणून दिली.
स्वतंत्र मत्स्यविद्यापीठाची स्थापना तातडीने व्हावी व यासंबंधीचा भालचंद्र मुणगेकर समितीचा अहवालाची अंमलबजावणी व्हावी या मागणी साठी रत्नागिरी मध्ये मनसे नेते अभिजीत पानसे यांची पत्रकार परिषद झाली होती. त्यामध्ये या सोबत आणखी एक विषयाला हात घालत अभिजीत पानसे यांनी महत्त्वाची मागणी केली होती की सदर समिती मध्ये रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयाला देखील सामावून घ्यावे. ७२० किलोमीटर समुद्र किनारा असलेल्या कोकणातील मासेमारीच्या बाबतीत धोरण ठरणार असेल व कोकणातील एकमेव तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या महाविद्यालयाला त्यात स्थान नसेल तर मनसे हे खपवून घेणार नाही त्यावर आवाज नक्की उठवू.
काल राज्य शासनाच्या मत्स्यविभागाकडून जि समिती जाहीर झाली त्या समिती मध्ये रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाला देखील स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे हा मनसेच्या प्रयत्नाचाच विजय आहे असे मनसे कडून कळविण्यात आले आहे.