
बिबट्याच्या हल्ल्यात पाडीचा मृत्यू
लांजा : रानात चरायला गेलेल्या गीर गायीच्या पाडीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास बापरे -तेलीवाडी येथे घडली आहे.
बापरे गावातील तेलीवाडी येथील शेतकरी मोहन साळुंखे यांनी नेहमीप्रमाणे आपली गुरे रानात चरायला सोडली होती. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबट्याने या गुरांपैकी एका गीर गायीच्या पाडीवर हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. बिबट्याने हल्ला केल्यानंतर जनावरांचा ओरडा ऐकून मालक मोहन साळुंखे त्या ठिकाणी धावत गेले. त्यानंतर बिबट्याने तिथून पलायन केले. यामध्ये मालक मोहन साळुंखे यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले,