
रत्नागिरीतील घिसाडी समाजाच्या ५० विद्यार्थ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप
महाराष्ट्रात रत्नागिरी तालुक्यात पहिल्यांदा घिसाडी समाजाला जातींचे दाखले वाटप
रत्नागिरी: जिल्ह्यामध्ये प्रथमच घिसाडी समाजासाठी ५० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे पार पडला. रत्नसिंधू योजनेची सदस्य किरण सामंत यांच्याशी या समाजाने संपर्क साधला होता गेली ५० वर्ष हा समाज रत्नागिरीमध्ये वास्तवाला असून भटकंतीमुळे त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक कामासाठी जात पडताळणीचा दाखला मिळणे कठीण झाले होते. या विद्यार्थ्यांचे वडिलांचे जात प्रमाणपत्र आहे मात्र आजोबांची जात प्रमाणपत्र नसल्याने या मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहावे लागत होते. ही बाब रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी जीवन देसाई यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ या विषयी लक्ष घालून तात्काळ कागदपत्रांचा पाठपुरावा करत या सर्व विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला.या विद्यार्थ्यांचा विषय लक्षात घेऊन तात्काळ यादी तयार करून २ दिवसात घिसाडी समाजाच्या मुलांचे जातिचे दाखले उपलब्ध करून दिले.
किरण सामंत यांच्या माध्यमातून घिसाडी समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केल्या बद्दल घिसाडी समाजाणे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, प्रांतधिकारी जीवन देसाई, ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी,किशीर मोरे, राजा चव्हाण, मुश्ताक खान, उज्ज्वला पंगेनरकर,रत्नागिरीतील पत्रकार उपस्थित होते.