
चंपक मैदानात होणाऱ्या मुस्लिम समाजाच्या जिल्ह्याच्या इस्तिमा ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली भेट
इस्तिमाच्या नियोजनाची केली पाहणी
रत्नागिरी :मुस्लिम समाजाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या जिल्ह्याच्या इस्तेमा 19 – 20 नोव्हेंबरला रत्नागिरी येथील चंपक मैदान येथे होणार आहे. त्याची तयारी जोरदारपणे सुरू असून त्याची पाहणी आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या व्यस्त दौऱ्यातुन वेळ काढून केली. मुस्लिम समाजाचा हा इस्तिमा महत्त्वाचा मानला जातो या इस्तिमासाठी जिल्ह्यातील हजारो लोक रत्नागिरी मध्ये येत असतात त्याचं नियोजनबद्ध काम आणि इस्लाम धर्माच्या शांततेच्या प्रतीक असणारे मोहम्मद पैगंबर यांचा संदेश पोहोचवण्याचं काम याच्या माध्यमातून केलं जातं. त्या नियोजनाची तयारी कोणत्या पद्धतीने चालू आहे इस्तिमासाठी कोणत्या अडचणी आहेत किंवा या मुस्लिम समाजाच्या इस्तीमेसाठी काय आवश्यक बाबी उपलब्ध करून देता येतील यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः सर्व अधिकाऱ्यांसहित चंपक मैदान येथे सुरू असणाऱ्या पेंडॉलचे काम पाहण्यासाठी भेट दिली इस्तिमा lच्या प्रमुख लोकांची यावेळी चर्चा केली त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांना मदत करणार असल्याचे शब्द यावेळेस रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
यावेळी समाजचे अल्ताफ संगमेश्वरी, मुसा काझी,सोहेल मुकादम,शकील मोडक,तालुका प्रमुख बाबू म्हाप, निमेश नायर,इस्तीमा जिल्ह्याचे प्रमुख, मुस्लिम समाजाचे सर्व बांधव उपस्थित होते
