
डिजीटल अर्थव्यवस्थेचा फायदा व्यापारी वर्गाला- अॅड. दीपक पटवर्धन
भाजपचा व्यापारी मेळावा
रत्नागिरी : भाजप हा शेठजींचा पक्ष मानला जातो. कारण व्यापारी वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. भाजप हा व्यापारी वर्गाचे प्रतिनिधीत्व करतो, अशी टीका केली जाते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॅग्नेटिक, कार्यक्षम नेतृत्व आहे. देशाला धैर्याने पुढे नेणारे नेतृत्व आहे. कोविडच्या कठीण कालखंडामध्येही हे नेतृत्व थांबले नाही. देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी आणली. भारताचे अर्थकारण गतिमान होत असून व्यावसायिक संधी वाढत आहेत. २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदीजींना सत्तास्थानी नेऊन रत्नागिरीमध्ये राहिलेली कसर आपण सर्वांनी मिळून भरून काढू. देशाच्या समाजाच्या प्रत्येक घटकाला त्याचा लाभ होणार आहे. ही किमया मोदीजींनी केवळ नऊ वर्षांमध्ये साध्य केली. नोटबंदीनंतर डिजीटल युग अवतरले व याचा सर्वांत जास्त फायदा व्यापारी, उद्योग वर्गाला झाला असे आकडेवारी सांगते, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
मोदी @ ९ अंतर्गत शुक्रवारी सायंकाळी गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित व्यापारी मेळाव्यात तो बोलत होते. या वेळी व्यासपीठावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रमोद जठार, रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळासाहेब माने, प्रदेश सचिव तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रभारी महेश जाधव, जिल्हासरचिटणीस राजेश सावंत ,सचिन वहाळकर , शहरध्यक्ष सचिन करमकर,तालुकाध्यक्ष मून्ना चंवडे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. वर्षा भोसले, उपाध्यक्ष सौ. आम्रपाली साळवे, उपाध्यक्ष सौ. शिल्पा मराठे आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी प्रास्ताविकात मोदी पर्वातील योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी केले. भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन ; दादा ढेकणे यांनी या व्यापारी मेळाव्याचे नेटके नियोजन केले.
सोल्यूशन देणारे मोदी सरकार- प्रमोद जठार
याप्रसंगी प्रमोद जठार म्हणाले की, हे मोदी सरकार सोल्यूशन देणारे सरकार आहे. असा एक पंतप्रधान मिळाला की जो प्रश्न, अपेक्षा विचारावर उत्तर शोधतो. संपूर्ण देशभरामध्ये मोदी @ ९ चे उपक्रम सुरू आहेत आणि भाजपा कार्यकर्ते सर्व देशवासियांचे आभार मानत आहेत. जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपा रत्नागिरीमध्ये वॉर रूम बनवत आहे. म्हणजे तुम्ही येथे तुमचा कुठलाही प्रश्न आणून द्या, तो प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली दरबारापर्यंत पोहोचवू.
व्यापाऱ्यांच्या ठामपणे पाठीशी- महेश जाधव
भाजपा प्रदेश सचिव तथा रत्नागिरी- सिंधुदुर्ग प्रभारी महेश जाधव म्हणाले की, पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी माझ्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षांचा कार्यकाळ सुवर्णकाळ मानला पाहिजे कारण विमानतळ, रस्ते, रेल्वेमार्ग मोठ्या प्रमाणात होत आहेत. पंतप्रधान मोदींना अमेरिकेने रेड कार्पेट घातले आहे. व्यापाऱ्यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभा राहणार आहे. व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून निश्चितपणे तुम्हाला दिलासा देऊ.
मोदीसाहेबांचे कल्याणकारी सरकार- बाळासाहेब माने
मोदींचे हे कल्याणकारी सरकार आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला होतं, तसं कल्याणकारी सरकार. अडचणी असतील त्या आपण दूर करूया. सामान्य असो वा मोठा व्यापारी या सर्वांना योग्य तो सन्मान मोदींच्या राज्यात, देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. मोदी सरकारला नऊ वर्ष झाली. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद यापूर्वी मोदी साहेबांना मिळाले तसे २०२४ सालीसुद्धा मिळावेत. आम्ही कार्यकर्ते प्रयत्न करू, पण तुम्ही सुद्धा मोदी साहेबांचे हितचिंतक, मित्र, फिलॉसॉफर, गाईड या माध्यमातून आपले सगळ्यांचे आशीर्वाद मिळू देत, असे प्रतिपादन रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळासाहेब माने यांनी केले.

या व्यापाऱ्यांचा सन्मान
याप्रसंगी भाजपाने कन्झ्युमर असोसिएशनचे अध्यक्ष अन्वरशेठ मेमन, क्रेडाईचे सुमित जैन, मोबाईल विक्रेते मनोहर ढेकणे, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे गणेश भिंगार्डे, कुवारबाव व्यापारी संघाचे नीलेश लाड, प्रभाकर खानविलकर व सहकारी, ब्युटीपार्लर संघटनेच्या सौ. मेधा कुळकर्णी, सुवर्णकार संघटनेचे संतोष खेडेकर, उद्योजक संघटनेचे दिगंबर मगदूम, नाभिक समाज हितवर्धक मंडळाचे प्रकाश हातखंबकर, व्यापारी प्रवीण मलुष्टे, आंबा बागायतदार संघाचे मंदार सरपोतदार यांचा सत्कार केला.