
मानसकोंड येथे जे एम म्हात्रे कंपनीकडून बोरवेल ब्लास्टिंग
ग्रामस्थ रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार
संगमेश्वर :राष्ट्रीय महामार्गचे सुरू असलेल्या कामामधील दगड फोडण्यासाठी बोरवेल ब्लास्टिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. बोरवेल ब्लास्टिंगवर जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह बंदी घातली होती. तसे लेखी आदेश यांनी कंपनीला आणि संबंधित विभागाला दिले होते. मात्र एम म्हात्रे कंपनीकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.
या बोरवेल ब्लास्टिंगमुळे मानसकोंड किंजळेवाडी येथील अनेक घरांना तडे गेले असून ज्या ठिकाणी घरे, शाळा, मंदीर, दर्गा, मस्जिद, देऊळ किंवा रहदारी आहे त्याठिकाणी बोरवेल ब्लस्टिंग वर बंदी घालण्यात आली होते. तसे लेखी आदेश जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी कंपनीला आणि संबंधित विभागाला दिले होते. मात्र एम म्हात्रे कंपनीच्या वरिष्ठांकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून मानसकोंड किंजळेवाडी गावातील घराना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. मानसकोंडच्या ग्रामस्थांच्या तक्रारीची नोद घेवून जिल्हाधिकारी यांनी राष्टीय महामार्गावरील बोरवेल ब्लास्टिंग तात्काळ बंद करण्याचे आदेश देऊन ही मनमानी करुन बोरवेल ब्लास्टिंग सूरू आहे. ग्रामपंचायतीने याला विरोध करून सुद्धा संबंधित ठेकेदारांचे कामगार जाणून-बुजून लोकांना त्रास देण्याचे काम करत आहे. ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रमुखाला जिल्हाधिकारी यांचे आदेश दाखवले आणि टॅक्टरने कंट्रोल ब्लास्टिंग करण्याची विनंती केली असता मी याच मशीनने ब्लस्टिंग करणार कुणाला काय तक्रार करायची ती करा, असे उद्गार ठेकेदार यांच्या प्रमुखाने काढले. या ठिकाणी एका वेळी 25 ते 30 पेक्षा जास्त होल मारून शंभर फुटापेक्षा खोल असे होल मारून या ठिकाणी बोरवेल ब्लास्टिंग केले जात होते. याचा फटका ग्रामस्थांना बसला असून मानसकोंड किंजळेवाडी गावातील अनेक घरांना तडे सुद्धा गेले आहेत. ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवला असून रविवारी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे पुन्हा तक्रार करुन न्याय मागणार आहेत. लोकांच्या घरांना तडे गेल्याने महिला वर्गाच्या डोळ्यात आश्रू वाहत आहे. कष्ट करुन.. पै...पै.. जमा करुन बांधलेले घर पडल्यास किंवा कमकुवत झाल्यास आम्ही जायचे कुठे असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
जर मानसकोंड पाच पीर दर्गे जवळची बोरवेल ब्लस्टिंग बंद झाली नाही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.यावेळी काही नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.